किरीट सोमय्यांनी केले ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

2019 मध्ये जालन्यातील जालना साखर कारखान्याच्या गैरव्यवहाराची तक्रार झालेली आहे.मात्र ठाकरे सरकारनं अर्जुन खोतकर यांच्या या कारखान्याचा गैरव्यवहार दाबून टाकला आता ईडीने या कारखान्याच्या खरेदीची चौकशी केल्यानं 10 हजार शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिलीय.आज सोमय्या हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात सोमय्या ते रामनगर साखर कारखान्याला भेट देणार आहेत तसेच शेतकऱ्यांशी देखील संवाद साधणार आहेत.

First Published on: December 1, 2021 2:18 PM
Exit mobile version