मुंबईकरांची दिशाभूल करण्याचं काम – महापौरांचं प्रत्यूत्तर

मुळामध्ये ही त्यांची पोटदुखी आहे. आज आपण इतकं चांगलं मुंबईकरांना देण्याचा प्रयत्न करत आहोत. आधी त्यांना वाटलं की हे होणारचं नाही. त्यामुळे जे आता शक्य झालंय तर आता कुठेना कुठे तरी भांडणं लावायची आणि मुंबईकरांची दिशाभूल करण्याचं काम करण्यासाठी आशिष शेलारांनी सुपारी उचललेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांसाठी ५०० चौरस फूट घरांना करमाफी केली आहे. त्याच्यामध्ये हे भांडणं वाढवण्याचं काम करत आहेत, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

First Published on: January 2, 2022 6:41 PM
Exit mobile version