मुंबईमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. दादर टीटी, हिंदमाता, किंग सर्कल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत असल्याने नागरिकांना याचा मोठा फटका होतोय. यासंदर्भात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी राबवण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती दिली.