“कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या कमी होण्यासाठी राज्यात येत्या १५ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, असे असताना देखील नाशिक जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ होताना दिसत आहे. तर काही ठिकाणी लागू करण्यात आलेल्या अंशत: लॉकडाऊनमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होत आहे. परंतु, गेल्या तीन चार दिवसांपासून बाधितांची संख्या एका विशिष्ट मर्यादेला स्थिर झाली आहे. ही बांधितांची संख्या पुर्णत: कमी करण्यासाठी कठोर निर्णय घेऊन १२ मेपासून दुपारी १२ पासून ते २३ मे पर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या कडक लॉकडाऊनच्या काळात जनतेच्या पूर्ण सहकार्याने आपण कोरोना विरूद्धची लढाई नक्की जिंकू, असा मला ठाम विश्वास आहे,” असं भाष्य नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे.