आजपासून काही खासगी कार्यालये सुरू झाली असून त्यांच्या सोयीकरता बेस्ट बसेसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. विरार-नालासोपारा येथील मुंबईला येणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांनी सकाळपासूनच बसेससाठी गर्दी केली आहे. मात्र अनेकांना या गाड्या फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच आहेत असे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे मुंबईला जाण्यासाठी प्रशासनाने गाड्यादेखील सोडल्या नसल्याने खासगी कर्मचाऱ्यांचे मात्र पुरते हाल होत आहेत. काही जण सकाळी सात वाजल्यापासून रांगेत उभे आहेत. मात्र कोणतीच व्यवस्था आणि महिती मिळत नसल्याने अनेकजण पुन्हा घरी परतले.