‘विरोधी पक्षाच्या नेत्यांना धमक्या देऊन पळविले’

विरोधी पक्षातील नेत्यांना आमिषे दाखवून आणि धमक्या देऊन आपल्या पक्षात घेतले आणि नंतर त्यांना पदे दिली, त्यामुळे हा विचारांचा पक्ष आहे का? असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपाचे नाव न घेता केला आहे. आज विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करून घोषणाबाजी केली. त्यानंतर ‘माय महानगर’ला पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. अधिवेशन पूर्ण वेळ चालायला हवे असून दुष्काळाबद्दलही सविस्तर चर्चा व्हायला हवी. तसेच भ्रष्ट्र मंत्र्यांना बदलले पण त्यांच्यावर कारवाई सरकारने केली नाही, अशी टिकाही त्यांनी राज्य सरकारवर केली.

First Published on: June 17, 2019 1:28 PM
Exit mobile version