अडीच हजार वर्षांनंतरही डॉ. बाबासाहेबांचे नाव घेतले जाईल

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समाधीचे दर्शन घेतले. ज्याप्रकारे आज अडीच हजार वर्षांनंतर गौतम बुद्धाचे नाव घेतले जात आहे, त्याप्रमाणे इथून पुढे अडीच हजार वर्षांनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेही नाव घेतले जाईल, अशी भावना राज्यपाल यांनी व्यक्त केली.

First Published on: December 6, 2019 11:24 AM
Exit mobile version