सरकारने भारत बंदची योग्य ती दखल घ्यावी

शहर, बाजारपेठा, बाजार समित्या या सुद्धा आजच्या भारत बंदच्या निमित्ताने उत्स्फुर्तपणे बंद आहेत. महाराष्ट्रातील जनतेने भारत बंदला चांगला प्रतिसाद देत अनेक ठिकाणी उत्स्फुर्तपणे बंद ठेवला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या भारत बंदला मिळालेल्या प्रतिसादाची योग्य ती दखल घ्यावी असे आवाहन किसान सभा, किसान संघर्ष समितीमार्फत करण्यात आले आहे. अकोले, अहमदनगर येथून शेतकरी नेते अजित नवले यांनीही भारत बंदला पाठिंबा दिल्यासाठी जनतेचे आभार मानले आहेत.

First Published on: December 8, 2020 1:25 PM
Exit mobile version