गावाकडचे किल्ले, गावाची चावडी, घराचा ओटा, घरासमोरील पडवी, गुरे-ढोरे या सर्वच गोष्टींचा अनभुव घ्यायचा असेल, तर कुठेही दूर जाण्याची गरज नाही. कारण ‘माणदेशी फाऊंडेशन’ने तुमच्यासाठी एक आगळीवेगळी पर्वणी आणली आहे. अस्सल ग्रामीण संस्कृतीचा मुंबईकरांना अनुभव घेता यावा याकरता प्रभादेवी येथे रविंद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात “माणदेशी महोत्सव”चे आयोजन केले आहे.