महाराजांची तुलना मी काय, कोणीही करू शकत नाही – मंगलप्रभात लोढा

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीची तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीशी केली आहे. ‘औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना डांबून ठेवलं होतं. पण ते स्वराज्यासाठी बाहेर पडले. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनादेखील कोणीतरी डांबून ठेवलं होतं. पण महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले,’ असं मंगलप्रभात लोढा म्हणाले. यासंदर्भात जोरदार टीका लोढा यांच्यावर करण्यात येत आहे. याच घडामोडीवर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला.

First Published on: November 30, 2022 5:39 PM
Exit mobile version