मनीषा कायंदे यांची निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रतिक्रिया

निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे, तो अत्यंत चमत्कारीक आहे. जे राजकारण सुरू आहे, ते अत्यंत गलिच्छ आहे. यामागे भाजपचा हात असून दबावाचे राजकारण सर्वांना दिसत आहेत, असं वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी केलंय. जे चिन्ह ठाकरे गटाला मिळाले आहे, ते आम्ही घरोघरी पोहचवू आणि निश्चित विजय आमचा होईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

First Published on: October 11, 2022 11:43 AM
Exit mobile version