वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाच्या युतीची अधिकृतपणे घोषणा झाल्याने राज्यात शिवशक्ती-भीमशक्ती पुन्हा एकत्र आल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. ठाकरे आणि वंचितच्या युतीनंतर महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष नाराज असल्याचं बोललं जातंय, यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या मनीषा कायंदे यांनी स्पष्टीकरण दिलंय.