याचे सर्व श्रेय मराठा समाजाला | अशोक चव्हाण

सकल मराठा समाजाने आपला दबाव कायम ठेवला त्यामुळेच आज मराठा आरक्षण मिळाले आहे. याबद्दल सकल मराठा समाजाचे मी अभिनंदन व्यक्त करतो. मराठा समाजाच्या प्रयत्नाचे हे यश आहे. आरक्षण मिळवण्यासाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली, त्यांना आज मी श्रद्धांजली व्यक्त करतो. आरक्षण आधीच जाहीर केले असते तर ४० लोकांचे प्राण वाचले असते. आघाडी सरकारने देऊ केलेले १६ टक्के आरक्षण युती सरकारने देऊ केले आहे. मात्र त्यांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी आम्ही करतो.

First Published on: November 29, 2018 2:04 PM
Exit mobile version