मुरुड, श्रीवर्धन, अलिबागमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान

मुंबईला असलेला चक्रीवादळाचा धोका कमी झालेला असला तरी पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. हे चक्रीवादळ केंद्रबिंदू पासून सरासरी दोनशे किलोमीटर पर्यंत परिणाम करते. निसर्ग चक्रीवादळाची दिशा बघता पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील प्रशासन दक्ष आहे. नागरिकांनीही काळजी घ्यावी, प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे निर्देश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.

First Published on: June 3, 2020 7:27 PM
Exit mobile version