कल्याण ग्रामीण आमदार राजू पाटील यांनी राज्य सरकार आणि आरोग्य मंत्र्यांकडे कोरोना रुग्णांच्या उपचार खर्चाबाबत मागणी केली आहे. कोरोना हा आजार काही रेशन कार्डचा रंग बघून होत नाही. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये उपचाराचे अमाप बिल लावले जात असताना ते कोणालाही परवडणारे नाही. तेव्हा सरकारने वेळीच यासंबंधी निर्यण घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.