तौक्ते चक्रीवादळाचा फटका ठाणे शहराला देखील मोठ्या प्रमाणात बसल्याने झाडांच्या फांद्या मोठ्या प्रमाणात पडल्याच्या घटना देखील घडल्याने ठाण्यात ठिक ठिकाणी कचरा जमा झालेला आहे. मात्र दोन दिवस उलटून देखील महापालिका प्रशासन आणि वृक्ष प्राधिकरनाला पडलेल्या झाडांची विल्हेवाट लावण्याचा विसर पडल्याने मनसे च्या वतीने आज रस्त्यांवर पडलेली झाडं आणि त्यामुळे साचलेल्या कचऱ्यात बसुन मनसेचे ठाणे विभाग प्रमुख महेश कदम यांनी कचऱ्यात बसुन ठिय्या आंदोलन केलं.