भारत-चीन सीमेवर गेल्या काही दिवसात प्रचंड तणावाचे वातावरण आहे. देश कोरोना संकटावर मात करत असतानाच चिनी ड्रॅगनने पुन्हा एकदा सीमा भागात कुरापती काढण्यात येत आहेत. नुकत्याच पूर्व लडाखच्या गलवान भागात चीनच्या सैन्याकडून झालेल्या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तसेच खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर आणि चिपळूण तालुका अध्यक्ष संतोष नलावडे यांच्या नेतृत्वाखाली चिंचनाका चिपळूण येथे चीनचा राष्ट्रध्वज जाळून निषेध करण्यात आली.