डोंबिवलीचे जावई असूनही मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केलं – राजू पाटील

गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण-डोंबिवलीच्या नागरी सुविधांवर मोठ्या प्रमाणावर ताण येत असूनही त्या प्रमाणात त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात सरकार आणि प्रशासनही अपयशी ठरल्याचंच दिसून आलं आहे. त्यामुळे नक्की या शहरांची समस्या काय आहे आणि त्यावर काय करायला हवं, यावर कल्याण ग्रामीणचे आमदार आणि मनसेने विधानसभेतील एकमेव सदस्य राजू पाटील यांना माय महानगरच्या खुल्लम खुल्ला या शोमध्ये आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे डोंबिवलीचे जावई असूनही त्यांनी कल्याण-डोंबिवलीकडे दुर्लक्षच केलं, अशी नाराजीवजा टीका केली.

First Published on: December 10, 2020 6:52 PM
Exit mobile version