मनसे पक्षावर टीका होणे, हे आता काही नवीन राहिलेले नाही, अशी प्रतिक्रिया मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी दिली. शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी मनसेचे भाजप पुरस्कृत असल्याची टीका केली होती. त्यावर शालिनी ठाकरे म्हणतायत की, कधी आम्ही राष्ट्रवादी पुरस्कृत असतो तर कधी काँग्रेस पुरस्कृत. फक्त भाजप पक्ष उरला होता. आज आम्ही भाजप पुरस्कृतही झालो, अशी उपरोधिक टीका शालिनी ठाकरे यांनी केली.