शिमग्यात गावाक गेलेले चाकरमानी गावातच ऱ्हवले

कोकणात शिमग्यासाठी आलेले चाकरमानी लॉकडाऊनमुळे अडकून पडले आहेत. त्यामुळे कोकणात बरेच मुंबईकर आणि पुणेकर अडकले आहेत. काही चाकरमान्यांचे कुटुंब हे मुंबई, पुण्यात असून त्यांना कुटुंबाची काळजी लागली आहे. कामधंदे ठप्प झाल्यामुळे नागरिकांना पैशाची चणचण भासत आहे. त्यामुळे ते कसेबसे दिवस पुढे ढकलत आहेत. आता लॉकडाऊनचा चौथा टप्पा घोषित होऊ शकतो, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अशाप्रकारे लॉकडाऊन वाढत राहिला तर सामान्य जनतेने कसं जगायचं? असा सवाल चाकरमानी करत आहे.

First Published on: May 16, 2020 5:47 PM
Exit mobile version