मुंबई शहरात सीआरपीसी कलम 144 अंतर्गत जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत अशा आशयाचे वृत्त माध्यमांमध्ये आल्याने मुंबईकरांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र ही बातमी खोटी असल्याची माहिती मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे.