कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र, आता कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. परंतु, तरी देखील राज्य सरकारने हे लॉकडाऊन येत्या १५ जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, नियमामध्ये शिथिलता आणली आहे. त्यामुळे मुंबई पुन्हा एकदा अनलॉक होत आहे. परंतु, मुंबई अनलॉक होत असली तरी देखील गाफिल राहू नका, अन्यथा पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत वाढ होईल आणि परत लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल. त्यामुळे काही चुका टाळणे फार गरजेचे आहे. त्या कोणत्या चुका टाळाव्यात पाहुया.