सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने राज्य सरकारला धक्का

ओबीसी राजकीय आरक्षणामुळे राज्यातील निवडणुका रखडल्या होत्या. राज्यातील निवडणुका दिवाळीनंतर होण्याची स्थिती होती पंरतु सर्वोच्च न्यायालायने ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरील सुनावणीदरम्यान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तात्काळ घेण्यात याव्यात असे आदेश दिले आहेत. यामुळे राज्यातील मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिकांसह उर्वरित मनपा निवडणुका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. जर राज्य सरकारने कार्यक्रम जाहीर केला तर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात निवडणुका घेण्यात येऊ शकतात.

First Published on: May 4, 2022 6:26 PM
Exit mobile version