हेलिकॉप्टर दुर्घटनेला भारतीय लष्कर जबाबदार; चीनचा कांगावा

तामिळनाडू कुन्नुर हेलिकॉप्टर दुर्घटनेत देशाचे पहिले सीडीएस बिपिन रावत यांचे निधन झाले. त्यांच्यासह त्यांची पत्नी मधुलिका आणि १२ जवानही या अपघातात मृत्यूमूखी पडले. या घटनेवर आत्ता जगभरातून शोक व्यक्त होत असताना कपटी चीनने मात्र गरळ ओकली आहे. सीडीएस बिपिन रावत यांच्या मृत्यूनंतर चीन सरकारने ग्लोबल टाइम्स या मुखपत्रातून भारताच्या लष्कराच्या शिस्तीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच या अपघातासाठी भारतीय सैन्यातील त्रुटी जबाबदार असल्याची निर्लज्ज टीपण्णी केली आहे.https://youtu.be/N-_v5N2tRp4

First Published on: December 10, 2021 11:47 AM
Exit mobile version