राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून नाना पटोलेंचा भाजपावर निशाणा

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात २०० पेक्षा जास्त मतं भाजप उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मिळतील, असा दावा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. परंतु या निवडणुकीमध्ये १८१ मतं द्रौपदी मुर्मू यांना मिळाले आहेत. २०० मतं घेऊ म्हणणाऱ्यांचे गर्वाचे घर खाली झाले आहे. भाजपाप्रणित ईडी सरकारवर नामुष्की आली आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

First Published on: July 22, 2022 6:06 PM
Exit mobile version