देशात बहुमताने पुन्हा एकदा आमचे सरकार येईल यासाठी आमचे कार्यकर्ते आता कामाला लागले आहेत. पुन्हा एकदा जनता मोदींच्या हाती सरकार देईल. जेवढ्या आघाड्या करायच्या तेवढ्या करू दे आम्ही सक्षम आहोत. या देशात अच्छे दिन आलेत आणि अजून येतील, असा विश्वास पीयूष गोयल यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.