इ.स.१७०५ च्या सुमारास श्री कालिका मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक श्रीमंत आहिल्याबाई होळकर यांनी केला. स्वातंत्र्यपूर्वकालिन म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या स्वराज्याच्या चळवळी पासून नाशिकची ग्रामदैवत असलेल्या श्री कालिका मंदिरात नवरात्रौत्सोवाला यात्रा भरू लागली व गावातील सर्व मंडळी, भाविक व स्वातंत्रसैनिक एकत्र जमू लागले. ४३ वर्षानंतर आज हे मंदिर नव्या रूपात दिमाखात उभे आहे. कोरोना संसर्गामुळे यंदा यात्रोत्सव रदद करण्यात आला आहे.