जनतेने भाजपचं मिशन लोटस हाणून पाडलं – नवाब मलिक

दिल्ली निवडणुकीसाठी भाजपने अमाप पैसा खर्च केला. पण, त्याचा फरक पडला नाही. घरोघरी मतं मागत असताना हजार प्रति व्होट देण्याचा व्हिडीओ वायरल झाला. अमित शहा, मोदी, योगी यांच्या सभा झाल्या. जातीय तेढ निर्माण केलं. दिल्लीतील जनतेने भाजपला राष्ट्रदोही म्हणून ठरवलं आहे. भाजपच्या राजकारणाला लोकं कंटाळले आहेत. जिथे काँग्रेस मजबूत तिथे इतर पक्षांनी मदत करायला हवं आणि जिथे इतर पक्ष मजबूत तिथे काँग्रेसने मदत करायला हवी. जनतेने भाजपचं मिशन लोटस हाणून पाडलं आहे. भाजपचे आमदार खासदार आमच्या संपर्कात आहेत. चंद्रकांत दादांना स्वप्न जास्त पडतात. त्यांनी कुणाचा तरी सल्ला घेतला पाहिजे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

First Published on: February 11, 2020 6:42 PM
Exit mobile version