केंद्र सरकार धार्मिक दुही माजवण्याचा प्रकार करत आहे

आसाममध्ये एनआरसीमुळे १९ लाख लोकांना निर्वासित म्हणून गणले गेले आहे. यामध्ये हिंदू नागरिकांची संख्या १४ ते १५ लाख आहे. आसामचा प्रश्न सोडविण्यासाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक आणले गेले, मात्र आता आसाममधूनच या विधेयकाला विरोध सुरु होत आहे. धर्माच्या नावावर होणाऱ्या दुहीकरणाला आम्ही विरोध करु, असे नवाब मलिक यांनी सांगितले. तसेच आयपीएस अब्दुर रेहमान यांनी राजीनामा दिल्यानंतर आम्ही त्यांची समजूत घालू, असेही ते म्हणाले आहेत.

First Published on: December 12, 2019 4:59 PM
Exit mobile version