राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून विरोधकांकडून हे सरकार टिकणार नाही, असे बोले जात आहे. तसेच सरकार अस्थिर असल्याचा देखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आरोप केला जात आहे. मात्र, सरकार अस्थिर नाहीतर खंबीर आहे. केवळ सरकारला बदनाम करण्याचे फडणवीसांचे षडयंत्र, असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे.