जनतेसमोर सत्य लवकरच उघड होईल – नवाब मलिक

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या १०० कोटी रूपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर सीबीआय चौकशीनंतर आज शनिवारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) मार्फत गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया देत “सत्तेचा दुरुपयोग करून सरकारला बदनाम केलं जातंय. माजी गृहमंत्र्यांना बदनाम करणे हा सगळा खेळ सुरू आहे. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. खरे काय आहे ते बाहेर येईलच आणि जे राजकारण सुरू आहे ते जनतेसमोर उघड होईल”, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

First Published on: April 24, 2021 4:18 PM
Exit mobile version