‘सत्ता गेल्यानंतर भाजपची तडफड’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचं विधानसभेत भाषण सुरू असताना भाजपने सभागृहाचा त्याग केला. तीन दिवसांत सर्व समजायला मुख्यमंत्री आर्यनस्टाईन नाहीत. भाजपकडून मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ही त्यांची तडफड असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. राजकारणाच्या सर्व बाजूने समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे थोडा वेळ लागेल. पण, भाजपची तडफड दिसते आहे. भाजपला आता लक्षात येतंय की आता त्यांचं काही खरं नाही त्यामुळे आता जनतेला सर्व कळत असल्याचंही आव्हाड म्हणाले.

First Published on: December 19, 2019 1:47 PM
Exit mobile version