शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शिवाजी महाराज विधानभवनात

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदर प्रकाश गजभिये हे प्रत्येक अधिवेशनात विविध वेष धारण करुन विधीमंडळात येतात आणि आपले प्रश्न हटके पद्धतीने उपस्थित करतात. यावेळी ते छत्रपती शिवाजी महाराजांचा वेष धारण करुन आले होते. शेतकरी आत्महत्या, कामगार, आदिवासी यांचे प्रश्न, आरक्षणाचे विषय प्रलंबित आहेत. त्यामुळे ज्या छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेत आलात त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी राज्य चालवा, असा संदेश प्रकाश गजभिये यांनी दिला आहे.

First Published on: November 22, 2018 12:09 PM
Exit mobile version