राज्यातील शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. राज्यात ज्या शेतकऱ्यांची वीज खंडीत करण्यात आली आहे. त्या शेतकऱ्यांची वीज जोडणी पुन्हा करण्यात येणार आहे. तसेच वीज तोडणी तात्पुरती थांबवण्यात आली असल्याची मोठी घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या हातात पिक येत नाही तोपर्यंत पुढील ३ महिने वीज पुरवठा खंडित करण्यात येणार नाही असे ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले आहेत.