राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र तरीही आज सकाळपासून मुंबईकर मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. सर्वसामान्यांसाठी सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. मात्र, जनता कर्फ्यूची उठताच मुंबईतील अनेक लोक आपापल्या खासगी वाहनानं गावाच्या दिशेनं निघाले आहेत. तर अनेकांनी भाजी घेण्यासाठी मंडयीत गर्दी केली आहे.