आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

दिवाळीनंतरही कोरोना बाधितांची संख्या कमी राहिली तर, निर्बंध असलेल्या भागात शिथिलता देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन दिवाळीनंतर निर्णय घेणार असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. सध्या कोरोना लसीचा एक डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्याची मुभान नसल्याने लोकांना असुविधतेतचा सामना करावा लागतोय यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन अशा लोकांना सवलती देता येईला का यासंदर्भात चर्चा केली जाईल अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

First Published on: October 17, 2021 6:20 PM
Exit mobile version