पोलिसांची जागोजागी नाकाबंदी, विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई

देशासह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात आज (गुरुवार) पासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. २२ एप्रिल ते १ मे पर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे आजपासूनच ठिकठिकाणी शहरात जागोजागी नाकाबंदी केली जात आहे. दरम्यान, अंबरनाथ शहरामध्ये नाक्यावर पोलिसांकडून वाहनांची चौकशी केली जात आहे. तसेच विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे.

First Published on: April 22, 2021 7:50 PM
Exit mobile version