घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांचा लाठीचा प्रसाद

करोनाचा संसर्ग वाढू नये या पार्श्वभूमीवर राज्यात १४४ कलम लागू करण्यात आला असून, नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे मात्र ठाणे कल्याण डोंबिवली परिसरात या आदेशाचे सर्रासपणे उल्लंघन करण्यात आले. अनेक हौशी नागरिक रस्त्यावर पडले त्यामुळे अनेकांना पोलिसांच्या लाठीचा प्रसादही खावा लागला. त्यामुळे जनतेला शासकीय आदेशाचे गांभिर्य नसल्याचेच यातून स्पष्ट हेात आहे.

First Published on: March 23, 2020 5:57 PM
Exit mobile version