राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पवई येथील हॉटेल रेनेसन्समध्ये मुक्कामी आहेत. त्या ठिकाणी काही पोलीस अधिकारी सध्या वेशात फिरताना आमदारांना आढळले. त्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. भाजप सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप देखील यावेळी आव्हाड यांनी केला.