राज्यातून गेल्या 3 महिन्यांमध्ये मोठे प्रकल्प गुजरातमध्ये गेले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात हे प्रकल्प गेल्यामुळे महाविकास आघाडीकडून टीका करण्यात येत आहे. परंतु मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे प्रकल्प गेले असून तत्कालीन ठाकरे सरकारने कोणतेही प्रयत्न केले नाही, असा आरोप विद्यमान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. मात्र नक्की खरं कोण? आणि खोटं कोण? अशी संभ्रमाची स्थिती राज्यात निर्माण झाली आहे.