CAA आणि NRC कायद्याचा गोंधळ निर्माण करुन हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दंगली भडकवण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र वंचित बहुजन आघाडीने हे दोन्ही कायदे हिंदूच्या विरोधात असल्याचे सांगण्यासाठी हे आंदोलन पुकराले आहे. NRC कायद्यात फक्त मुस्लिमच नाही तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटके-विमुक्त असे ४० टक्के जनता यात भरडली जाईल, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.