मागाठाणे मतदार संघातील आमदार प्रकाश सुर्वे यांनी पाणीप्रश्नासंदर्भात सभागृहाचे लक्ष वेधले. मागाठाणे मतदारसंघात वन खात्यामध्ये केतकीपाडा, सावित्रिबाई फुले नगर, रामनगर, दामूनगर यासारख्या भागात नळजोडणी करून देत नाहीत. आज देखील अशी परिस्थिती आहे की, महिलांना पाण्याचे हंडे डोक्यावरून घेऊन जावे लागतात. त्यामुळे त्या टकल्या झाल्या, असे आमदार प्रकाश सुर्वे यांनी म्हटलंय.