आधी जनतेचे प्रश्न समजून घेणार – रणनीतीकार प्रशांत किशोर

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी अद्यापही पक्ष स्थापन करणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. भविष्यात गरज पडल्यास नव्या पक्षाची घोषणा करणार असल्याचं देखील संकेत त्यांनी दिले आहेत. बिहारमधील जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी ३ हजार किमीचा प्रवास करणार असल्याचे प्रशांत किशोर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले आहे. एवढेच नाही तर बिहारमधील जवळपास १७ हजार लोकांना ते भेटणार आहेत. ज्यांच्यामध्ये बिहारचे प्रश्न सोडविण्याची क्षमता असल्यामुळे बिहारमधील बदलाची तळमळ त्यांना लागली आहे.

First Published on: May 5, 2022 8:06 PM
Exit mobile version