प्रताप सरनाईकांनी उद्धव ठाकरेंविरोधात व्यक्त केली खंत

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटुंबावर आलेल्या संकटाच्या वेळी मदत केली नाही. अनेकवेळा टाळाटाळ करण्यात आली. वाढदिवसाच्या वेळीसुद्धा बोलावणे आले नाही अशी खंत असल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटल आहे. यापुर्वीच प्रताप सरनाईक यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपसोबत युती करावी अशी विनंती केली होती. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे त्यामुळे विजय होईल. परंतु राज्यात आता सत्ता बदली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार असल्यामुळे विकासासाठी काम करणार असल्याचे प्रताप सरनाईक म्हणाले.

First Published on: July 7, 2022 9:10 PM
Exit mobile version