‘कुरघोडी करा, पण जनतेचा भ्रमनिरास करु नका’

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अनलॉकची घोषणा केल्यावर लगेच राज्य सरकारने सांगितले की, अनलॉकचा विषय विचारधीन आहे. यामुळे राज्यातील जनतेमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. यावरुन विरोधकांनी राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे म्हटले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या पक्षांमध्ये अंतर्गत बेबनाव व विसंवाद दिसून येतो. अंतर्गत समन्वय नसल्यामुळे यांचा खेळ होतोय, परंतु महाराष्ट्राची जनता मात्र भरडली जातेय असा घणाघात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

First Published on: June 4, 2021 7:56 PM
Exit mobile version