माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारनं जाहीर केलेल्या पॅकेजवर समाधान व्यक्त केलं होतं. त्यानंतर त्यांनी निधी उभा करण्यासाठी केंद्र सरकारला नवा मार्ग सुचवला आहे. सरकारनं ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेलं सोनं कर्जानं ताब्यात घेण्याची सूचना केली आहे. हे सोने १ किंवा २ टक्के व्याजानं परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावं,” असा सल्ला पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारला दिला आहे.