मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान काही शेतकरी आपले प्रश्न राज ठाकरेंसमोर मांडत होते. यावेळी राज ठाकरेंनी प्रश्न जाणून घेतल्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊ, असे आश्वासन दिलं. तर लगेच शेतकऱ्यांना तुम्ही मला मतदान करत नाही, तर अडचणीच्या काळात का येता? असा प्रश्न विचारला. यावर शेतकऱ्यांनी आता असं होणार नसल्याचे सांगितले आहे.