‘केवळ सणा मधून रोगराई पसरते. यांच्या मेळाव्या आणि हाणामारीतून रोगराई पसरत नाही. बाकी सर्वांचे मेळावे सुरू आहेत. भास्कर जाधव यांच्या मुलाने मंदिरात जाऊन अभिषेक केला. यांच्यासाठी मंदिरं सुरु आहेत. बाकीच्यांनी मंदिरात जायचं नाही. यांनी मेळावे, सभा घ्यायच्या पण आम्ही दहीहंडी साजरी करायची नाही. यांची बाहेर पडायला फाटते यात आमचा काय दोष’, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं.