राज्यातील पोलीस कारवाईसाठी सज्ज, मशिदींवरील भोंग्यांवरुन वातावरण तापलं

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील भाषणाबाबत आजच कारवाई करण्यात येईल. औरंगाबाद पोलीस आयुक्त सभेबाबत कारवाई करतील. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडल्यास पोलीस कारवाई करतील अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी दिली आहे. सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. राज्यभरात पोलीस तैनात करण्यात आले असल्याची माहिती महासंचालकांनी दिली आहे.

First Published on: May 3, 2022 5:39 PM
Exit mobile version