भाजपच्या ‘त्या’ पत्रकार परिषदेवरून राज ठाकरे मोदींवर बरसले

शुक्रवारी भाजपची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा हजर होते. या परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे अमित शहा यांनी दिली. पत्रकारांनी मोदींना विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर मोदींनी दिले नाही. सर्व प्रश्नांची उत्तरे अमित शहा यांनी दिले. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींवर टीका केली आहे. ‘पत्रकारांच्या प्रश्नांना मोदी उत्तर देऊ शकत नाही, याचा अर्थ त्यांचा मानसिक पराभव झाला आहे. आता २३ तारखेला त्यांचा पूर्ण पराभव होईल’, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.

First Published on: May 18, 2019 6:20 PM
Exit mobile version